मी पवित्र त्रिवेणी संगम मध्ये स्नान केलं आणि त्या त्रिवेणीच्या पाण्याला विचारलं,
“माझी पापं तू गोळा केलीस का?”
नदी म्हणाली, “हो.”
मी विचारलं, “आता त्यांचं काय करणार?”
त्रिवेणी हसत म्हणाली,
“मी वेडी आहे का ती माझ्याकडे ठेवायला? ती मी समुद्रात जमा करीन.”
मग मी समुद्राकडे जाऊन विचारलं,
“त्रिवेणीकडून माझी पापं तुझ्याकडे आली का?”
समुद्र म्हणाला, “हो.”
मी विचारलं, “आता त्यांचं काय करणार?”
समुद्र हसून म्हणाला,
“मी वेडा आहे का ती माझ्याकडे ठेवायला? ती मी ढगांकडे सोपवीन.”
मी मग ढगांकडे जाऊन विचारलं,
“समुद्राकडून माझी पापं तुमच्याकडे आली का?”
ढग म्हणाले, “हो.”
मी विचारलं, “आता त्यांचं काय करणार?”
ढग हळूच कुजबुजले,
“आम्ही वेडे आहोत का ती ठेवायला? आम्ही ती पावसाच्या रूपाने पुन्हा खाली बरसू.”
मी विचारलं, “कोणावर?”
ढग खट्याळपणे हसले आणि म्हणाले,
“तुझ्यावरच!”
त्या क्षणी मला एक गूढ जाणीव झाली —
आपण कुठेही गेलो तरी कर्म आपला पाठलाग करतंच.
विश्व आपल्याला सतत स्मरण करून देतं की चांगलं करा, चांगलं जगा, कारण आपल्या कृतींचं फळ शेवटी आपल्याकडेच परत येतं.
हेच खरं कर्माचं सार आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें